Wednesday, 21 May 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 47 – गद्यातुन देवनागरीच्या दोन-वेलांट्या दोन-उकार वापरुन मराठीने लेखनातील अप्रमाणीकरणाला आमंत्रण दीले.



युनिकोड ते साऊंडकोड लेख 47 –
गद्यातुन देवनागरीच्या दोन-वेलांट्या दोन-उकार वापरुन मराठीने लेखनातील अप्रमाणीकरणाला आमंत्रण दीले.

(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)

मराठीने गद्यातुन मोडी लीपी आणी पद्यातुन बाळबोध लीपी हजारो वर्षे वापरली. मोडी लीपीत एक-वेलांटी एक-उकार आहे. बाळबोध लीपीत दोन-वेलांट्या दोन-उकार आहेत. मराठीने गद्यासाठी एक लीपी व पद्यासाठी दुसरी लीपी का बरे वापरली? याचा वीचारही न करता प्रींटिंग टेक्नॉलॉजीचा स्वीकार करताना देवनागरीतील दोन-वेलांट्या व दोन-उकार वापरायला मराठीने सुरवात केली. याला व्याकरणीय पुरावा जोडण्यासाठी त्या काळातल्या संस्कृत-प्रचुर व्यक्तींना ब्रीटीश सरकारने हाताशी धरले. दादाजी पांडुरंग तर्खडकर या वीशीतल्या युवकाकडुन प्रसीद्ध केलेले संस्कृत-प्रचुर मराठीचे व्याकरण ग्राह्य मानुन सरकारने कलेक्टरचे फतवे, सरकारी फर्माने, कोर्टांचे नीर्णय, जमीनजुमल्याचे करारनामे देवनागरीतल्या दोन-वेलांट्या दोन-उकार वापरुन प्रसीद्ध करायला सुरवात केली. त्यावेळच्या सन्मानीय राजकारणी मराठी धुरंधरांनी काढलेली वर्तमानपत्रेही दोन-वेलांट्या दोन-उकार यांचा वापर सर्रास करु लागले कारण त्यांचा घनीष्ट संबंध संस्कृतशी होता. गद्यातुन दोन-वेलांट्या व दोन-उकार वापरणे हा पायंडा पडु लागला कारण त्याआधीच्या इतीहासात प्रींटीग झालेली पाने समाजाच्या हातात कधीच पडलेली नव्हती. प्रींटींग टेक्नॉलॉजीतील नावीन्याच्या नवलाइने हरखुन जाण्याचे ते दीवस होते.

गद्यातुन मोडी लीपीतल्या केवळ एक-वेलांटी एक-उकार यात वावरणार्‍या मराठीला, देवनागरीच्या दोन-वेलांट्या दोन-उकार यातुन वावरता, का बरे आले? हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. होय ना? याचे साधेसुधे सरळ उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

गद्यासाठी शब्दांना दीलेला भाषीक अर्थ मराठी भाषा केवळ, नीव्वळ, फक्त त्यातल्या 'जातीगुणवैशीष्ट्य' या ध्वनी गुणधर्मातुन जाणते. 'इ' व 'ई' यातील आणी 'उ' व 'ऊ' यातील 'जातीगुणवैशीष्ट्य' एकच, समान व सारखे आहे. 'ई' व 'ऊ' यातुन दर्शवला जातो तो केवळ 'इ' व 'उ' यांना लेखनातुन स्पष्ट केलेला 'आ' उच्चाराएवढ्या दीर्घ-उच्चार-वेळेएवढा घ्यावयाचे 'कालमापन'. याचा संबंध मराठी शब्दातील अर्थ समजण्यासाठी कोणतीही बाधा आणत नाही.

उदाहरण – 'कुमुदिनिसाठी, कुमुदिनीसाठी, 'कुमुदीनिसाठी, कुमुदीनीसाठी, कुमूदिनिसाठी, कुमूदिनीसाठी, 'कुमूदीनिसाठी, कुमूदीनीसाठी, कूमुदिनिसाठी, कूमुदिनीसाठी, कूमुदीनिसाठी, कूमुदीनीसाठी, कूमूदिनिसाठी, कूमूदिनीसाठी, 'कूमूदीनिसाठी, कूमूदीनीसाठी' 'कुमुदिनिसाठि, कुमुदिनीसाठि, 'कुमुदीनिसाठि, कुमुदीनीसाठि, कुमूदिनिसाठि, कुमूदिनीसाठि, 'कुमूदीनिसाठि, कुमूदीनीसाठि, कूमुदिनिसाठि, कूमुदिनीसाठि, कूमुदीनिसाठि, कूमुदीनीसाठि, कूमूदिनिसाठि, कूमूदिनीसाठि, 'कूमूदीनिसाठि, कूमूदीनीसाठि' या बत्तीस शब्दांचा अर्थ मराठीसाठी एकच समान व सारखाच ठरतो.

गद्यासाठी या बत्तीस शब्दांत लेखनातील प्रमाणीकरण कसे घडवायचे? हा प्रश्न दोन-वेलांट्या दोन-उकार स्वीकारल्याने नीर्माण होतो. तेच जर मराठीच्या ''उपजत, मुलभुत, पारंपारीक, शास्त्रीय, नैसर्गीक, स्थीरतत्त्वानुसार'' गद्यात एक-वेलांटी एक-उकार स्वीकारले तर तो शब्द केवळ, नीव्वळ व फक्त ''कुमुदीनीसाठी'' असा एकाच प्रकारे लीहीता येतो व संपुर्ण शुद्ध-नीयमावली नेस्तनाबुत होउन मराठी गद्य लेखन आपोआप सहजसुलभ, सोपे, अचुक, शास्त्रीय, उपजत, मुलभुत व नैसर्गीक ठरते. कीती साधा सोपा मार्ग आहे हा ! आजच्या 'शुद्धलेखन नीयमावलीला' शीथील करत बसण्यापेक्षा, मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन वीचार करुन, एक-वेलांटी एक-उकार मराठी गद्यासाठी स्वीकारुन, 'शुद्धलेखन नीयमावली' कायमची नेस्तनाबुत केली, की बस्स !!

मोडी लीपीच्या काळात मराठी गद्य लेखनातील शब्दात आपोआप नीश्चीत व शंभर टक्के प्रमाणीकरण साधले जात होते कारण त्यात केवळ एक-वेलांटी एक-उकार होता. ब्रीटीशांच्या काळात, प्रींटींग टेक्नॉलॉजीच्या उदयाच्या काळातच मराठीचे पहीलेवहीले चुकीचे पुस्तकी व्याकरण सर कॅरी यांनी सन 1805 साली, महाराष्ट्रातील तज्ञ संस्कृत-पंडीतांना हाताशी धरुन प्रसीद्ध केले आणी त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर (जन्म 9 मे 1814, मृत्यु 17 ऑक्टोबर 1882) यांनी ''महाराष्ट्र भाषेचे व्याकरण'' (पहिली आवृत्ती 1836) इंग्रजी सरकार तर्फे प्रसीद्ध केले.

तेव्हापासुन दोन-वेलांट्या दोन-उकार मराठीत वापरल्या जाउ लागल्या. मराठीने मराठीला बदलण्याचा अधीकार कोणालाही दीलेला नसताना या सर्व व्यक्तींनी दुसर्‍या भाषेचे व्याकरण (संस्कृतचे व्याकरण) मराठीत घुसडले आणी मराठीवरील संस्कृतच्या अत्याचाराची सुरवात झाली. त्याकाळी यासर्वांनी मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरता वीचार केला असता तर मराठीला आजची दयनीय, केवीलवाणी, मानहानीची स्थीती भोगायला लागली नसती.

त्याकाळी प्रींटींग टेक्नॉलॉजीतुन मराठीला मीळणारे वैभव मराठीने गद्यातुन एक-वेलांटी एक-उकार वापरला असता तरी तेवढेच व तसेच मीळाले असते. त्यामुळे प्रींटींग टेक्नॉलॉजीतुन मराठीला मीळणारे वैभव देवनागरीतल्या दोन-वेलांट्या दोन-उकार यामुळे मीळाले असे मुळीच म्हणता येणार नाही. पण त्याकाळी मीळणार्‍या वीकासाचे श्रेय देवनागरीतील दोन-वेलांट्या दोन-उकार यांनाच जणु दीले गेले. सामान्यांना यातील बारकाव्याशी कोणतेही सोयर-सुतक नव्हते आणी 'माननीय पुढारी, लोकनेते, राजकीय धुरंधर, . . ' वगैरे सर्व व्यक्ती संस्कृत-प्रचुर कौटुंबीक व्यवस्थेतुन साकारल्या होत्या.

जगायचे मराठीत, वावरायचे मराठीत, व्यवहार करायचा मराठीत, पण संधान व बांधीलकी मात्र संस्कृतची, अशी मायमराठीच्या सजीवतेची चुकीची ठेवण, मांडणी, रीत नीर्माण झाली. जी आजपर्यंत तशीच सुरु आहे. हा अक्षम्य गुन्हा कळत की न कळत या सर्व माननीय व्यक्तींकडुन घडला गेला? याचा इतीहास बघणे गरजेचे नसुन आता यापुढे यातुन बाहेर येण्याचा आणी मराठीची 'उपजत, मुलभुत, पारंपारीक, शास्त्रीय व नैसर्गीक' स्थीरतत्त्वे जपण्यासाठीचा अचुक उपाय खंबीरपणे राबवीण्याची गरज आहे.

देवनागरी हा शब्द आजमीतीस 'स्क्रीप्ट' यानावाने युनीकोड माध्यमातुन जगभर प्रसीद्ध झाला आहे आणी त्याची व्याप्ती व संबंध ''संस्कृत, हिन्दी व मराठी'' या तीन्ही भाषेशी जोडला जात आहे. मराठीसाठी ''लीपी'' म्हणजे 'स्क्रीप्ट' नसुन, '''उच्चार, अक्षर, चीन्ह, लेखन, अर्थ''' यांचा संगम म्हणजे लीपी होय. मराठीचे हे स्वाभावीक अद्वीतीय अंतरंग सर्वांगांनी सामोरे येण्यासाठी मराठीने स्वतःच्या लीपीचे नाव 'मराठमोळी' असे जाहीर करणे ही मराठीच्या स्वतंत्र, स्वावलंबी, स्वाभीमानीपणाची पहीली पायरी ठरते.

समाजातील प्रत्येकाला ''ध्वनी, कागद व संगणक'' या तीन्ही माध्यमांतुन मुक्त, मनसोक्त, स्वच्छंदपणे वावरता येण्यासाठी, सर्व मराठी बोलींना आपापल्यापरीने वावरण्याची संधी मीळण्यासाठी आणी हे सारे करताना लेखनातील प्रमाणीकरण कोणताही नीयम न करता पाळता येण्यासाठी, मराठीने देवनागरीतच राहुन गद्यासाठी एक-वेलांटी एक-उकार वापरणे हा सहजसोपा मराठीच्या स्थीरतत्त्वांवर आधारलेला उपाय त्वरीत अमलात आणणे गरजेचे आहे.

यापुढे तरी मराठीने स्वतःची '''शास्त्रीय, नैसर्गीक, क्षेष्ठ, सक्षम, कुशल, सर्वसमावेशक, उपजत आणी मुलभुत''' ओळख जगाला करुन द्यावी. मराठीच्या वीचारापुढे कृपया, ''जात, पात, धर्म, पंथ, पक्ष, . . . वगैरे'' गोष्टी त्याज्य मानुन सर्वांनी 'सर्वसमावेशक मराठी' अशी भुमीका घ्यावी. जर आपण सर्वांनी ठरवले तर ही 'सर्वसमावेशक मराठी' भुमीका, या आधुनीक काळात, ज्ञानेश्वरांच्या मनातील वैश्वीक क्षीतीजापर्यंत, आपण मराठीला पोचवु शकु, याची मला खात्री वाटते. यातुन '''मराठीतील उपजत, मुलभुत, शास्त्रीय व नैसर्गीकपणाला साजेलसे '''जडणघडण, व्यवस्थापन, व्याकरण''', मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरतेच लिहीणे आवश्यक आहे''' या वीचारांना नीश्चीतता मीळते.

मराठीचे असे '''जडणघडण, व्यवस्थापन, व्याकरण''', 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/  ग्रुपवर क्रमवार मांडत आहे. 'अवघा मराठी तीतुका मेळवुया, मराठमोळ्या मायमराठीला स्वतंत्र करुया' यासाठी सामील व्हा.

संपर्क साधा शुभानन गांगल
मोबाइल 9833102727
इमेल shubhanan.gangal@gmail.com

Sunday, 4 May 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 46 – मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 11



युनिकोड ते साऊंडकोड लेख 46 – मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 11

(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)

काही वर्षांपुर्वी संस्कृत भाषेच्या व्याकरणाबाबतची माहीती हा अधीकार केवळ काही तज्ञ व्यक्तींच्याच मालकीचा असल्यासारखे घडत होते. आता याबाबत 'माहीतीचा अधीकार' हा नीयम वापरण्याचीही गरज नाही ! ! इंटरनेटवर संस्कृतच्या व्याकरणाबाबत पुरातन आणी नवीन अशी अगणीत माहीती उपलब्ध आहे. आजवर संस्कृतबाबत फारसा गौरव नसलेला, संस्कृतमधील तृटी दाखवणारा मजकुर, कोणीही प्रसीद्ध केला की संस्कृतचे अंधश्रद्धाळु भक्त 'कायहो, तुम्ही ........ हे पुस्तक वाचले आहे का?' असे वीचारीत. जर ते वाचले असेल तर मग पुन्हा दुसर्‍या पुस्तकाचे नाव सांगुन, 'कायहो, तुम्ही ........ हे पुस्तक वाचले आहे का?' असे वीचारीत असत. वीषयाला बगल देउन, वीषयातील ठरावीक भागावर सयुक्तीक चर्चा न करता, 'हे पुस्तक वाचले हे का?', असे विचारुन स्वतःच्या वीद्वत्तेचा देखावा करुन, दुसर्‍याला 'गप्प बसा' असा सल्ला देण्याचाच तो प्रकार वर्षानुवर्षे पाळला जात होता. एकुण काय 'संस्कृतचा केवळ गौरव करायला शीका, नाहीतर तोंडे बंद ठेवा' असा प्रकार होता. शास्त्रीयतेने वीचार करणार्‍या कोणाही व्यक्तीला त्यामुळे 'तोंड बंद ठेवावे' लागत होते.

मला लहानपणी आमचे शीक्षक आम्हाला व इतरांना मुक्तपणे सांगत, 'तुम्हाला मराठी भाषेबाबत नीट कळायला हवे असेल तर आधी संस्कृत शीका'. आता सामाजीक जागृतीमुळे शीक्षक वरील वीधान करत नाहीत. आता सामान्यपणे, 'मराठीच्या व्याकरणाच्या पुस्तकात दीलेले वाचा', असे उत्तर शीक्षक देतात! समजा कोणी वीद्यार्थ्याने त्यांना 'ए' हा संयुक्त-स्वर का? असे वीचारले तर 'व्याकरणात दीले आहे म्हणुन', असे गुरुजांचे उत्तर असते. 'पण अहो गुरुजी, जर 'ऐ' स्वरात असलेले 'अ' आणी 'इ' हे दोन स्वर आहेत हे उच्चारुन कळते, 'औ' स्वरात असलेले 'अ' आणी 'उ' हे दोन स्वर आहेत हे उच्चारुन कळते, तर 'ए' स्वरात असलेले तुम्ही सांगता ते दोन स्वर का ऐकु येत नाहीत?', असा प्रश्न वीद्यार्थ्याने गुरुजींना केला तर, बीच्चारे गुरुजी काय उत्तर देणार? 'उगाच भलते सलते प्रश्न वीचारु नका. मोठे झालात की ते कळेल', असे सांगुन त्यांना स्वतःचे अज्ञान लपवावे लागते.

'शारीरीक वाढ झाल्यावर ''काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर'' यातील बर्‍याच भागांची व्याप्ती नीट कळते कारण ते ज्ञान 'शारीरीक वाढीवर' अवलंबुन असते', याच वैद्यकीय-तंत्राचा उपयोग व वापर मुलांवर करुन ''मराठी-भाषा कळणे हे शारीरीक वाढीवर जोपासले जाते'' असे जणु ते सांगतात ! ! हे असे असते का? पण काय करणार? शीक्षकांना आपले अज्ञान मुलांपासुन लपवण्यासाठी हे सारे करावे लागते. यात त्या शीक्षकांचा दोष मुळीच नसुन एकुण समाजाने मराठी भाषेला कळत नकळत ''संस्कृत-भाषेचे गुलाम'' बनवील्याचा हा पडसाद व प्रतीसाद आहे. हे सार्‍या महाराष्ट्रात घडत आहे. याची कुठे बातमीही होत नाही, इतके ते स्वाभावीक ठरत आहे. माणसाला दोन हात, दोन पाय, दोन डोळे असतात इतकेच स्वाभावीक ''मराठी-भाषा संस्कृतची गुलाम व मांडलीक आहे'' हे ठरले आहे. का बरे असे घडले? स्वतःला मराठी म्हणुन घेणार्‍या स्वाभीमानी व्यक्तींनी आता तरी सत्य जाणुन घ्यायला नको का?

यापुढे तरी तुम्ही वीद्यार्थी असा वा शीक्षक तुम्हाला मराठी-पुस्तकी-व्याकरणातील अडलेले प्रश्न मुक्तपणे एकमेकांना वीचारायला शीका. 'आम्हाला व्याकरण फारसे माहीत नाही', हे पालुपद आजन्म जपण्यापेक्षा चौकसपणे त्याचा पाठपुरावा करा. त्यातुन संस्कृत-भाषेच्या प्रभावाचे धुके नीवळुन, मायमराठीचे उपजत व मुलभुत व्यक्तीमत्व प्रखरतेने सामोरे येइल.

'मराठी हाजीर हो ऽऽऽ' या उपक्रमातुन संस्कृत व मराठी यांची तुलना करत, उपजत व मुलभुत मराठी भाषा, संस्कृतपेक्षा सर्व बाबतीत ''भाषा'' म्हणुन कशी श्रेष्ठ आहे ते मांडत आहे. मराठीला श्रेष्ठ म्हटलेले अजुनही संस्कृत-भक्तांना आवडत नाही. पण माझा नाइलाज आहे कारण जे सत्य आहे ते मी कथन करत आहे. कोणाला आवडेल वा नावडेल यासाठी सत्य-स्वरुपाला शीथील करण्यापेक्षा रोखठोकपणे जे आहे ते तसेच मांडणे योग्य ठरते.

'मराठी हाजीर ऽऽऽ' या उपक्रमातुन संस्कृत भाषेशीच तुलना करावी लागत आहे कारण इतर कोणत्याही भाषेच्या व्याकरणाने मराठी-भाषेवर आक्रमण व अत्याचार केलेले नाहीत. केवळ संस्कृत-भाषेमुळे मराठीवर अमर्याद नामुश्की लादली गेली असल्याने संस्कृत भाषेशीच तुलना करणे क्रमपात्र ठरते. कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त वीस्तृत चर्चा होण्यासाठी या उपक्रमातील मजकुर जरा दीर्घ होत आहेत, याची जाणीव आहे. पण एखादा वीषय फारसा अपुरा न ठेवता, त्याची थोडीशी का होइना पण सर्व बाजुंनी चर्चा होणे गरजेचे ठरते, अन्यथा दीलेली माहीती अपुरी म्हणजेच चुकीची असल्याचा दोष पत्करावा लागतो. अर्थात कोणालाही कोणतीही वीस्तृत चर्चा करायची असेल तर त्यांनी मला जरुर भेटावे वा फोन करावा.

याचबरोबर कोणत्याही इतर भाषेचा उल्लेखही न करता, मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरताच वीचार करत मराठीची 'जडणघडण' हा उपक्रमही सादर करत आहे. मराठी भाषेने शैक्षणीक क्षेत्रात 'व्याकरण' या एकाच नावाने मराठी-भाषेचे उपजत मुलभुत अस्तीत्व शीकवणे अयोग्य ठरते. मुलांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे आणी मराठी नव्याने वा प्राथमीक स्वरुपातुन शीकणार्‍या व्यक्तींना त्यांच्या आकलनाप्रमाणे मराठी शीकवणे योग्य ठरते. बाळांना जसे आपण 'दुध, कावळा, मांजर, कुत्रा' असे शब्द प्रथम न शीकवता त्यांना त्यांच्या आकलनाप्रमाणे प्रथम 'दुदु, काउ, माउ, भुभु' असे शब्द शीकवतो तसेच येथे आहे. त्यासाठी 'जडणघडण, व्यवस्थापन आणी व्याकरण' असे तीन भाग वा टप्पे नीर्माण केले आहेत. हे सर्व टप्पे वीवीधतेने तपासुन पुर्ण झालेले असले तरी तेही टप्प्या टप्प्यानेच सादर करणार आहे. कारण आज मराठीवर लादल्या गेलेल्या 'चुकीच्या पुस्तकी व्याकरण' आणी 'शुद्धलेखन नियमावली' यांच्या बर्‍याच काळातील सहवासामुळे समाजात नीर्माण झालेले गैरसमज व गृहीते टप्प्या टप्प्यानेच पुसुन नेस्तनाबुत करणे गरजेचे ठरते. 'जडणघडण' हा उपक्रम मात्र अगदी आटोपशीरपणे केवळ एकेका पानात मांडुन सादर करत आहे. त्याला गणीती पद्धतीचे 'प्रमेय' स्वरुप दीले आहे. एकेका प्रमेयातुन सीद्ध झालेला नीकष तळात देऊन मराठीची 'जडणघडण' सादर करत आहे.

'मराठी हाजीर हो ऽऽऽ' हा उपक्रम आणी 'जडणघडण' हा उपक्रम एकमेकांना पुरक आहेत. जर यापैकी कोणताही केवळ एकच सादर केला तर मनातल्या प्रश्नांना योग्य उत्तरे मीळणार नाहीत. 'मराठी हाजीर हो ऽऽऽ' हा उपक्रम वीश्लेषणात्मक व वर्णनात्मक म्हणता येइल तर 'जडणघडण' हा उपक्रम व्याख्यात्मक म्हणता येइल. 'जडणघडण' या उपक्रमातुन सादर केलेला परीसर चीत्रमय स्वरुपातुन अचुकपणे कसा शीकवावा हा भागही तयार असुन शालेय अभ्यासक्रमात तो सहजतेने आणता येइल. अर्थात त्याआधी आजचे ''पुस्तकी व्याकरण'' व ''शुद्धलेखन नियमावली'' पुर्णपणे नेस्तनाबुत करण्याची मानसीकता ठोसपणे नीर्माण होणे गरजेचे ठरते. त्यासाठीच क्रमाने 'मराठी हाजीर हो ऽऽऽ' हा उपक्रम आणी 'जडणघडण' हा उपक्रम सादर करत आहे.

याबाबतील मला लहानपणी ऐकलेली ''नावाडी आणी संस्कृत-पंडीत'' ही गोष्ट आठवते.

''''गंगा नदी एका तीरावरुन दुसर्‍या तीरावर पार करुन जाण्यासाठी एक संस्कृत-पंडीत बोटीत बसतात. संस्कृत-पंडीतांना स्वतःच्या वीद्वत्तेचा मोठा अभीमान व गर्व असतो. ते नावाड्याला वीचारतात, 'कायरे, तु ऋग्वेद वाचला आहेत का?'. बीच्चारा नावाडी 'नाही' म्हणतो. संस्कृत-पंडीत म्हणतात, 'म्हणजे तुझा पाव जन्म फुकट गेला. बरे तु यजुर्वेद तरी वाचलास का?'. बीच्चारा नावाडी 'नाही' म्हणतो. संस्कृत-पंडीत म्हणतात, 'म्हणजे तुझा अर्धा जन्म फुकट गेला. बरे तु सामवेद तरी वाचलास का?'. बीच्चारा नावाडी 'नाही' म्हणतो. संस्कृत-पंडीत म्हणतात, 'म्हणजे तुझा पाउण जन्म फुकट गेला'. तेवढ्यात वादळ येते. बोट हलायला, डुलायला लागते. नावाडी संस्कृत-पंडीतला विचारतो, 'काय हो, पोहता येते ना?'. संस्कृत-पंडीत 'नाही' म्हणतो. बोट बुडते. संस्कृत-पंडीत बुडतो. नावाडी मात्र पोहुन कीनार्‍याला सुखरुप परततो.''''

आजच्या 'चुकीच्या मराठी पुस्तकी व्याकरणाची' आणी 'शुद्धलेखन नियमावली'ची बोट, मराठीच्या संस्कृत-प्रचुर व्याकरणकारांसह बुडणार आहे आणी उपजत मुलभुत मायमराठी नव्या आधुनीक युगाच्या कीनार्‍यावर सुखरुपपणे पोचणार आहे. यात मला कोणतीही शंका नाही !

यापुढे तरी मराठीने स्वतःची '''शास्त्रीय, नैसर्गीक, क्षेष्ठ, सक्षम, कुशल, सर्वसमावेशक, उपजत आणी मुलभुत''' ओळख जगाला करुन द्यावी. मराठीच्या वीचारापुढे कृपया, ''जात, पात, धर्म, पंथ, पक्ष, . . . वगैरे'' गोष्टी त्याज्य मानुन सर्वांनी 'सर्वसमावेशक मराठी' अशी भुमीका घ्यावी.

जर आपण सर्वांनी ठरवले तर ही 'सर्वसमावेशक मराठी' भुमीका, या आधुनीक काळात, ज्ञानेश्वरांच्या मनातील वैश्वीक क्षीतीजापर्यंत, आपण मराठीला पोचवु शकु, याची मला खात्री वाटते.

'''मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 11''' हा आहे संस्कृत व मराठी भाषा संदर्भातील '''मराठी हाजीर हो ऽऽऽ' आणी 'जडणघडण' या दोन उपक्रमांची  नीश्चीत गरज सांगणारा'' पहीला ठोस पुरावा.

यातुन '''मराठीतील उपजत, मुलभुत, शास्त्रीय व नैसर्गीकपणाला साजेलसे व्याकरण मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरतेच लिहीणे आवश्यक आहे''' या वीचारांना नीश्चीतता मीळते.

क्रमाक्रमाने असंख्य पुरावे सादर करत आहे.

या अभीयानाचे नाव आहे '''मराठी हाजीर हो ऽऽऽ'''. हा उपक्रम 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुक ग्रुपवर सादर होत आहे. सर्व मराठी प्रेमींनी यात जरुर सामील व्हावे. त्यासाठी 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/  ग्रुपवर 'अवघा मराठी तीतुका मेळवुया,  मराठमोळ्या मायमराठीला स्वतंत्र करुया' यासाठी सामील व्हा.

संपर्क साधा शुभानन गांगल
मोबाइल 9833102727
इमेल shubhanan.gangal@gmail.com

Sunday, 27 April 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 45 – मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 7



युनिकोड ते साऊंडकोड लेख 45 – मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 7

(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)

भाषा आणी त्यासाठीची चीन्हे यांचा उगम हा क्लीष्ट व सुक्ष्म अभ्यासाचा वीषय ठरतो. त्यात आपण जीतके खोलात जाउ तेवढे ''आपण जन्मभर केवळ वीद्यार्थीच राहणार'' याची नीश्चीतता फक्त प्राप्त होते. अभ्यासातुन मीळालेला अनुभव फक्त आपण इतरांशी वाटु शकतो. 'मराठी हाजीर हो ऽऽऽ' या प्रकल्पातुन मी तुमच्याबरोबर चर्चा करत माझे अनुभव मांडत आहे.

आजवर अगणीत व असंख्य व्यक्तींनी याचा शोध घेत आपले आयुष्य खर्च केले. त्यांचे आपण ऋणी राहणार आहोत. 'भाषा आणी त्यासाठीची चीन्हे' यांचा सर्वात जुना उपलब्ध इतीहास बघण्याचा प्रयत्न केला तर आपण '''सर्वात जुनी लीखीत सामुग्री 'सुमेरीयन' ठरते''' इथपर्यंत पोचतो. पंजाब प्रांतातील 'हराप्पा' व सिंध प्रांतातील 'मोहेन जो दडो' येथील उत्खनात दोन प्राचीन नगरांचा शोध लागला. येथे सातशेपेक्षा जास्त मुद्रा सापडल्या. संशोधकांनी त्यांचे 'सांकेतीक चीत्रचीन्हे' असे वर्गीकरण केले.

येथे सापडलेल्या उत्खनात मानवी संस्कृतीचे म्हणण्यापेक्षा मानवाच्या 'सुक्षीतावस्थेचे' अनोखे दर्शन यातुन घडते असे म्हणता येते.

'मोहेन जो दडो'ची माहीती तेथल्या परीसरातील लोकांना परंपरेने पीढ्यानपीढ्या होती. पण त्यातील ऐतीहासीक मुल्ये ओळखण्याचे काम 1922 साली, म्हणजे जवळजवळ तीनहजार सातशे वर्षांच्या प्रचंड कालावधीनंतर, 'रखालदास बंद्योपाध्याय' या Archaeological Survey of India येथे काम करणार्‍या ऑफीसरने केले. आता त्याबाबत मीळालेली नवी माहीती व संशोधन इंटरनेटवर प्रसीद्ध झाले आहे.

समजा आपल्याला चीनी वा जपानी भाषेत लीहीलेल्या मुद्रा सापडल्या असे धरुन चालु. त्याला आपण प्रथमदर्शनी काय म्हणु? अहो, त्याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याने, त्याही आपल्यासाठी 'सांकेतीक चीत्रचीन्हे'च ठरतात नाही का? 'सांकेतीक चीत्रचीन्हे' याचा मला कळलेला अर्थ 'याचा संबंध उच्चाराशी व अर्थाशी निगडीत आहे' असा ठरतो!

याबाबतचे प्रा. लॉडन यांनी केलेले 288 मुद्रांबाबतचे संशोधन प्रसीद्ध आहे. इतरही अनेकांनी याबाबत अभ्यासकरुन मते व्यक्त केली आहेत. आपण केवळ त्यांना काय वाटले ते थोडक्यात जाणु घेउ.

येथे सापडलेली 'सांकेतीक चीत्रचीन्हे' म्हणजे त्याकाळची लीपी होय. त्यातील अक्षरांची ओळख 'पुर्व-इलामाइट'शी जास्त जवळ आणी सुमेरीयन लीपीपासुन थोडी वेगळी आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे ही अक्षर-लीपी ठरते, चीत्र-लीपी नाही, कारण ही लीपी ध्वनीसापेक्ष आहे. त्यात भारतीय भाषा-लीपींच्या संदर्भातील मला सापडलेली माहीती पुढीलप्रमाणे आहे.

सर जॉन मार्शलनी त्यांच्या 'मोहेन जो दडो आणी सिंधु संस्कृती' या ग्रंथात इसवीसन पुर्व 2400 मधल्या एका मुद्रेचा उल्लेख केला. ही मुद्रा 'तेलोह' येथे सापडली असुन आता ती पॅरीसमधल्या 'लुवरे' वस्तुसंग्रहालयात आहे. कै. अ. ब. वालावलकर यांनी त्यावरील चीन्हाचे वाचन 'मऋमाल' असे केले आहे. कोणत्याही 'पुरातन चीन्हांचे वाचन करणे' हे येरा गबाळ्याचे काम नाही. येथे सापडलेल्या मुद्रांवरील 'सांकेतीक चीत्रचीन्हे' यावरुन 'अशोकाचे ब्राह्मी-लेख म्हणजे भारतातील आद्यलेखन होते' या कल्पनेला तडा जातो.

'मोहेन जो दडो आणी सिंधु संस्कृती' हा वीषय अफाट संशोधनाचा आहे. साडेचार हजार वर्षांपुर्वी मानवाच्या सांस्कृतीक कल्पनेतील सामुहीक जीवनाचे दाखले येथे मीळतात. शहर, इमारती, घरे, रस्ते, वीहीरी, स्नान गृहे, संडास, सांडपाण्याच्या नीचर्‍याची सोय, राहण्याची घरे, घराच्या जोत्यांसाठीच्या मोठ्या वीटा (10 X 20 X 40 सेंटीमीटर), भींतींसाठीच्या वीटा (7 X 14 X 28 सेंटीमीटर), वीहीरीसाठी गोलाकार साधणार्‍या त्रिकोणी वीटा, काय काय व कीती कीती दर्शन येथे मीळते. यातुन त्यावेळच्या रहीवाश्यांना साधायचा असलेला संवाद व त्यासाठी उपयोगी पडणारी भाषा सुद्धा कीती क्षमतेची असावी याचे प्रत्यंतर येते.

'सिंधी' समाजाची भाषा ही भारताची सर्वात जुनी भाषा असल्याचे यातुन कळते पण आताच्या सिंधी समाजाला स्वतःचा देश वा प्रांत सुद्धा नाही. ही खंत माझ्या काही सिंधी मीत्रांनी व्यक्त केल्याने, माहीत असलेल्या नव्या उपलब्ध माहीतीच्या आधारे काही वर्षांपुर्वी मी सिंधी-संस्कृतीच्या लीपीचा फॉण्ट बनवला होता. सिंधी संस्कृतीच्या '''लीपीच्या संस्कृतीचे''' नाव आहे 'खुदावादी'. हा प्रयत्न म्हणजे केलेल्या केवळ अभ्यासाचा तुटपुंजा व अर्धवट परीसर असल्याची मला खात्री आहे ! पण तरीही मराठी-भाषा-उच्चाराशी, 'सिंधी-भाषा-उच्चाराचा' येणारा संबंध 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या ग्रुपवर पोस्ट केलेल्या चीत्रातुन काहीसा कळेल.

आता आपण इतीहासातुन, म्हणजे अनेक इतीहासकाराच्या दृष्टीकोनातुन नीश्चीत पुराव्यासह सामोरी आलेली, काही मते पाहु.
1) ब्राम्ही लीपी मौर्यकाळात धार्मीक आणी राजकीय कामकाजासाठी वापरली जात होती.
2) गौतम बुद्धाच्या हयातीतही बुद्ध धर्मवीषयक ग्रंथातुन लेखनासाठी ब्राम्ही लीपी वापरात होती.
3) सौराष्ट्र नाणी गुप्त नाण्यांपुर्वीची आहेत व त्यातील लेखनात ब्राम्ही लीपीशी साम्य आढळते.
4) संशोधक प्रीन्सेप च्या म्हणण्यानुसार प्राचीन संस्कृत लीपी व ग्रीक वर्णमाला यात साम्य दीसुन येते.
5) जुनी ग्रीक लीपी उजवीकडुन डावीकडे लीहीली जाइ असे. त्यातील अक्षरे ब्राम्ही लीपी उलटी करुन साधलेली आहेत.
6) ब्राम्ही लीपी भारतात स्वतंत्रपणे निर्माण झाली.
7) आर्यांनी वर्णमालेचा शोध लावला नाही. ते ज्या देशात स्थायीक झाले, तीथल्या लेखनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला.
8) पाली कींवा लाट वर्णमालेवरुन देवनागरी बनवीण्यात आली.
9) भारतातील पाली कींवा लाट वर्णमाला मुळात तुराणीयन कींवा द्रवीड बोलीभाषांसाठी उपयोगात आणली जात होती.
10) तांत्रीक अक्षरचीत्रे व देवनागरी लीपी यांचा जवळचा संबंध आहे, असे मत प्रसीद्ध लीपी संशोधक शामशास्त्रींनी मांडले आहे.
11) इसवीसन पुर्व तीसर्‍या शतकात ब्राम्ही लीपी सर्वत्र प्रचारात होती त्यामुळे तीचा उगम तांत्रीक ग्रंथात शोथणे व्यर्थ आहे.
12) संशोधक डिरिंजर म्हणतात की, 'ब्राम्ही लीपी ग्रीक लीपीपासुन नीघाली हा सीद्धांत मला समाधानकारक वाटत नाही'.
13) कै. अ. ब. वालावलकर यांनी आपला 'Pre-Ashokan Brahmi' हा नीबंध 1951 साली प्रसीद्ध केला. त्यात त्यांनी ब्राम्ही ही भारतीयांची प्राथमीक लीपी नसुन त्या काळात अशोककालीन इतर अनेक भारतीय लीप्यांना समान पातळीवर आणण्यातुन उदयास आली. अशी ब्राम्ही लीपी भारतीय लिप्यांची जननी होती इतकेच नव्हे तर अभारतीय अशा सेमिटीक लीप्यांचीही जननी होती.
14) अशोकाची ब्राम्ही हे पुर्वीच्या ब्राम्ही लीपीचे विकृत रुप होय.
15) कै. अ. ब. वालावलकर म्हणतात, 'इसवीसनापुर्वीच्या दुसर्‍या शतकात ब्राम्ही वापरली जात होती आणी संस्कृतच्या पाणिनींच्या पुर्वीच ब्राम्ही अक्षरांचे पारंपारीक लेखन नीश्चीत झाले होते. याबाबतचा दाखला म्हणुन त्यांनी '''झोखा मुद्रेचा''' (इसवीसनपुर्व 2400) चा पुरावा सबळ मानला.
16) ब्राम्ही लीपीची उत्क्रांती (1) हारप्पन (इसवीसनपुर्व 2500 ते 1700), (2) अप्रकाशीत ब्राम्ही-लीपी (इसवीसनपुर्व 1700 ते 600) यापुढे कदाचीत याबाबत पुरावे मीळतील, (3) मौर्य राजवटीपुर्वीची ब्राम्ही लीपी (इसवीसनपुर्व 600 ते 250) याचा संबंध खरोष्टी-लीपीशी लावला जातो, (4) मौर्य राजवटीतील ब्राम्ही लीपी (इसवीसनपुर्व 350 ते 150) सम्राट अशोकाच्या राजवटीतील लेखन, (5) मौर्य राजवटीच्या नंतरची ब्राम्ही लीपी (इसवीसनपुर्व 150 ते सन 250).
17) माननीय संस्कृत व्याकरणकार पाणिनि यांनी संस्कृतचे व्याकरण अंदाजे इसवीसनपुर्व 400 या काळात लीहीले. म्हणजे आज आपल्याला ठाउक असलेल्या संस्कृत भाषेच्या व्याकरणा आधी ब्राम्ही लीपी वापरली जात होती.
18) पाणिनी व्याकरणाबाबतची स्वतंत्र मते त्यानंतरच्या संस्कृतच्या पतंजली, पींगल, शौनक, यस्क, वरारुची, शाकट्य, अशा अनेकांनी मांडली आहेत.  

अहो हा सारा परीसर या लेखात कशासाठी? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. 'मराठी-भाषा' हा वीषय नीघाला की बरेच वेळा तीची नीर्मीती कशी झाली?, हा वीषय नीघतो. त्यातुन '''मराठी-भाषा कशी आहे?''' हा वीषय राहतो दुर आणी '''मराठी-भाषेची-नीर्मीती कशी झाली?''' यावरच ध्यान दीले जाते. का? तर त्यातुन मराठीवर झालेला व्याकरणीय परीणाम कळेल म्हणुन !

'''मराठी-भाषेची-नीर्मीती कशी झाली?''' आणी '''मराठी-भाषा कशी आहे?''' हे दोन अतीशय भीन्न वीषय ठरतात, हे आधी नीट स्पष्ट करायचे आहे. आपण हाताळत आहोत '''मराठी-भाषा कशी आहे?''' हा वीषय. मग त्यात खुदावादी, ब्राम्ही, पाली, खरोष्टी, संस्कृत या भाषांचा सुळसुळाट हवा कशाला? जर आपल्याला मराठी ही स्वतंत्र भाषा आहे असे मान्य असेल तर मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरताच वीचार करता येतो. आजच्या वर्तमानकाळातील मराठी आधी आपण नीट स्वतंत्रपणे मांडले तर तीची नीट व्यवस्थीत अचुक ओळख होइल आणी मग 'तीची नीर्मीती कशी झाली असावी? हा वीषय हाती घेता येइल. नाहीतर '''मराठी-भाषा कशी आहे?''' या वीषयाला बगल देउन पुन्हा पुन्हा 'संस्कृत' भाषेचा जप करुन अडथळा आणु नका, हे यामागचे सांगणे आहे!

आता सांगा साडेचार हजार वर्षांपुर्वीचा इतीहास जाणुन त्याचा परीणाम तुमच्या माझ्या जीवनावर कसा व कीती झाला हे शोधणे महत्त्वाचे की आजची आपली 'मराठी' भाषा कशी आहे?, हे जाणुन घेणे महत्त्वाचे? मग मराठी-भाषेचा वीषय नीघाला की संस्कृत-भाषेशीच केवळ का बरे सोयर-सुतक पाळायचे? 'मोहेन जो दडो आणी सिंधु संस्कृती' येथे प्रकट झालेला स्तुप बौद्ध-धर्माची साक्ष देतो. तसेच जैन धर्मही खुप खुप पुरातन असल्याची खात्री पटते. यांचा सुद्धा उगम व वावर आपल्याच भारतात झाला. संस्कृत भाषेचे अस्तीत्व जेव्हा जेव्हा जेथे जेथे प्रगट झालेले इतीहासात दीसते तेव्हा तेव्हा व तेथे तेथे प्राकृत-भाषाही अस्तीत्वात होत्या, असे दाखले मीळतात. मग मराठी-भाषा केवळ संस्कृत मधुनच साकारली असे का म्हटले जाते? या जाहीरातीची सुरवात कोणी, केव्हा व कशी केली? हाच खरा तर संशोधनाचा वीषय ठरतो! !

'''आजची मायमराठी आणी तीच्या वीकासात येणारे अडथळे''', यांचा वीचार हाच केवळ, फक्त व नीव्वळ वीषय घेतला तर आजचे 'चुकीचे-मराठी-पुस्तकी-व्याकरण' व 'अनावश्यक-शुद्धलेकन नियम' हा सर्वात महत्त्वाचा परीसर ठरतो.

तुमच्यावर संस्कार हा तुमच्या कुटुंबाकडुन झाला. तुमच्यावर झालेल्या संस्कारात, तुमच्या जन्मापासुन अवतीभोवती असलेल्या व्यक्तींचा हात होता, असे म्हणता येते. वर्तमानकाळातील प्रत्येक कुटुंबात आजी-आजोबा, आई-बाबा, मुले अशा तीन पीढ्या असतात. या तीन्ही पीढ्यांचे 'मराठी' भीन्न असते. गेल्या प्रत्येक पीढीतील 'आजी-आजोबा' आपल्या नातवंडांना 'कायरे तुमचे हे मराठी!', 'आमच्या काळात कसे अगदी छान मराठी होते', असे सांगत आले आहेत ! ! तरीही प्रत्येक वर्तमानकाळातील तीन्ही पीढ्या, कुटुंबात 'मराठी'तुनच संवाद साधत आल्या. यातुन काय कळते? मराठी-भाषा नक्की ओघवती आहे. पण या ओघवतेपणात बदलली असली तरीही ती स्वतःचे 'मराठी' म्हणुन असलेले अस्तीत्व टीकवुन धरु शकते.

'''बदल झाला तरीही अस्तीत्व टीकुन राहते''', म्हणजे नक्की काय? याचा आपण वीचार करु. समजा जर तुम्हाला 'अ' हे अक्षर दहा भीन्न प्रकारे लीहुन हवे असेल तर काय कराल? अहो आजुबाजुच्या दहा व्यक्तींना 'अ' लीहायला सांगा ! ! प्रत्येक व्यक्तीचे हस्ताक्षर भीन्न असावे, हा काही नीयम नाही. हा काही सीद्धांत नाही. पण हे असे घडते हे मात्र खरे आहे. अहो, त्यामुळेच तर आपल्या 'सही'ने म्हणजे आपल्या हस्ताक्षराने आपल्या बँकेतील पैशांचे व्यवहार सुरक्षीतपणे हाताळले जातात ! ! हे कीत्येक वर्षे तपासुन घेतलेले अत्याधुनीक सत्य ठरते. आता समजा जर तुम्हाला 'अ' अक्षराचे 100 भीन्न प्रकार हवे असतील, तर तुम्ही काय कराल? अहो शंभर व्यक्तींकडुन 'अ' लीहुन घ्या ! ! पण या सर्व भीन्न असलेल्या रेखाटनातुन आपल्याला 'अ' हेच अक्षर कळेल. होय ना? म्हणजेच जरी 'अ' चीन्ह-लेखनाची ढब, रीत, ठेवण भीन्न असल तरी तो 'अ' ठरु शकतो. यातुन आपल्याला काय कळते? 'अ' या अक्षरात बदलप्राप्तता असते. असे असंख्य बदल झाले तरी त्या 'अ'चे 'अ' म्हणुन असलेले अस्तीत्व 'अ' गमावत नाही. यातुन आपल्याला 'अ' बाबतच्या 'स्थीरतत्त्वा'ची ओळख होउ लागते. 'अ' मध्ये लेखनात बदल झाले तरी तो 'अ' म्हणुन 'ओळखता येतो' पण 'का ओळखता येतो?' हे नक्की मांडता व सांगता येतच असे नाही, होय ना?

तसेच मराठी-भाषेचे आहे. अहीराणी, कोकणी, कोल्हापुरी, खानदेशी, वर्‍हाडी, . . . अशा अनेक बोली-भाषांची भाषा 'मराठी' आहे. 'मराठी' ही बोली नाही. का बरे या सर्व बोली-भाषा (संदर्भ-1) 'मराठी' ठरतात? तसेच ज्ञानेश्वरांपासुन तुकाराम, शीवाजी, पेशवे आणी आजचे तुम्ही-आम्ही यांची भाषा 'मराठी'च ठरते. काळाच्या ओघात 'मराठी'त झालेला बदल कळत असला तरी 'मराठी' भाषेने तीचे अस्तीत्व गमावले नाही (संदर्भ-2). का बरे हे असे 'मराठी'त घडु शकते? कोणत्याही वर्तमानकाळात असलेल्या आजी-आजोबा, आई-बाबा आणी मुले यांच्या 'मराठी'तील भीन्नता आपणास जाणवते. पण तरीही 'मराठी' तीचे अस्तीत्व गमावत नाही (संदर्भ-3). हे असे 'मराठी'त घडते. हे संस्कृत-भाषेत घडु शकत नाही. कारण पाणीनींनी संस्कृत भाषेला तीच्या व्याकरणातुन स्थीर, अचल, बंदीस्त बनवले आहे. मग '''मराठी भाषेत संस्कृत भाषेतील बरेच शब्द जसेच्या तसे स्वीकारले गेले आहेत''' हा वीचारच त्याज्य म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचे तर मुर्खपणाचा ठरतो ना?

'मोहेन जो दडो आणी सिंधु संस्कृती'पासुनच्या इतीहासात मानवासाठीचा भाषा हा वीषय कसा, कुठे, कीती बदलत गेला याचा अभ्यास होत आहे. यातुन केव्हा व कशी मराठीची स्थापना झाली? व आजची मराठी बनली? या वीषयापेक्षा आजची 'मराठी' म्हणजेच आपल्याला ज्ञात असलेल्या इतीहासातील अस्तीत्व कायम ठेवलेली 'मराठी' कशी आहे? याचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

आपण जर हा अभ्यास पुर्ण केला तर मराठीतील 'बदलप्राप्त गुणधर्मांच्या आधारे' इतीहासाचा मागोवा घेत 'मराठी'च्या उगमस्थानाकडे पोचण्याची शक्यता कदाचीत निर्माण होइल. संस्कृत-भाषेचा याच्याशी काडीमात्र संबंध नाही, हेही यातुन कळायला सुरवात होते.

मग संस्कृत-भाषा जगातील सर्व भाषांची जननी असो वा नसो, काय फरक पडतो? संस्कृत-भाषा देव-भाषा असो वा नसो, काय फरक पडतो? आपल्याला आधी आजची, आपली, आणी महाराष्ट्रात आज वावरणारी 'मराठी' कशी आहे? हे माहीत करुन घ्यायला हवे आहे. यासाठी ''संदर्भ-1-बोली'', ''संदर्भ-2-काळाचा ओघ'', ''संदर्भ-3-तीन पीढ्या'' अशा ओघवत्या परीस्थीतीतुन 'मराठी' तीचे अस्तीत्व कायम टीकवुन का व कशी राहु शकते ते शोधणे गरजेचे ठरते. संस्कृतसारख्या बंदीस्त व कुपमंडीत भाषेला याचे ज्ञान कुठुन मीळणार? संस्कृत भाषेकडुन ही अपेक्षा करणे म्हणे 'आत्याबाईंना मीशा असत्या तर?' असे म्हटल्यासारखे होईल. कदाचीत हे उदाहरण बर्‍याच जणांना आवडणार नाही. पण तुलना करताना त्याचे अधीक स्पष्टीकरण न देता वीषयाच्या गांभीर्यापर्यंत पोचायचे असेल तर हेच उदाहरण योग्य ठरेल, असे मला वाटते.

'मराठी'तील बदलप्राप्तता शोधणे म्हणजेच मराठीतील '''स्थीरतत्त्वे'' शोधणे होय. गेल्या तीस वर्षांच्या अथक प्रयत्नातुन मराठीची '''स्थीरतत्त्वे'' शोधण्याचे काम केले आहे. आजच्या ''चुकीच्या-पुस्तकी-व्याकरणाचा'' आणी ''अनावश्यक-शुद्धलेखन-नीयमांचा'' कळत नकळत झालेला समाजावरील परीणाम 'मराठी'बाबतची चुकीची गृहीते मनामनात ठसवीण्यात झाला आहे. त्यातुन उगाचच असंख्य प्रश्न निर्माण झाल्यासारखे वाटतात. पण जर आपण आजच्या ''चुकीच्या-पुस्तकी-व्याकरणाचा'' आणी ''अनावश्यक-शुद्धलेखन-नीयमांचा'' त्याग केला आणी मराठीच्या '''शास्त्रीय, नैसर्गीक, क्षेष्ठ, सक्षम, कुशल, सर्वसमावेशक, उपजत आणी मुलभुत'''पणाचा स्वीकार केला तर मराठीला संस्कृतसारखा वेश देण्याच्या प्रयत्नातुन निर्माण झालेले असंख्य प्रश्न पुर्णपणे व कायमचे नेस्तनाबुत होतील.

'''मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 7''' हा आहे संस्कृत व मराठी भाषा संदर्भातील '''आजच्या संस्कृत-प्रचुर ''चुकीच्या-पुस्तकी-व्याकरणाला'' आणी ''अनावश्यक-शुद्धलेखन-नीयमांना'' कधीही मांडता न येणारी मायमराठीतील '''स्थीरतत्त्वे संकल्पना''' याबाबतचा ठोस पुरावा.
यातुन '''मराठीतील उपजत, मुलभुत, शास्त्रीय व नैसर्गीकपणाला साजेलसे व्याकरण मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरतेच लिहीणे आवश्यक आहे''' या वीचारांना नीश्चीतता मीळते.
क्रमाक्रमाने असंख्य पुरावे सादर करत आहे.

या अभियानाचे नाव आहे '''मराठी हाजीर हो ऽऽऽ'''
हा उपक्रम 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुक ग्रुपवर सादर होत आहे.
सर्व मराठी प्रेमींनी यात जरुर सामील व्हावे.
त्यासाठी 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/  ग्रुपवर 'अवघा मराठी तीतुका मेळवुया, मराठमोळ्या मायमराठीला स्वतंत्र करुया' यासाठी सामील व्हा.

संपर्क साधा – शुभानन गांगल
मोबाइल – 9833102727
इमेल – shubhanan.gangal@gmail.com